घराच्या रस्त्यावर होतं ..
ती फुलं तुडवत जाताना अगदी वाईट वाटायचं.. पण रस्त्याच्या कडेकडेने वाट काढत येणंच तेव्हा योग्य होतं. मग त्यातल्या त्यात चार पाच टप्पोरी फुलं वेचून आणायची नि घरी आल्यावर आईला द्यायची.
सुंदर दिवस होते ते..
आता आपण तसे नाही.. आता आपण तिथे रहात नाही.. त्या रस्त्यावर गेलं की ते झाडं मात्र तिथेच उभं दिसतं.. तसंच बहरलेलं .. तसंच डोलत दिसतं.. मग मनाला जरासं बरं वाटतं..
आता शहर वेगळं.. रस्ते वेगळे.. ओळखीच्या खाणाखुणाही नव्याने निर्माण झालेल्या.. त्यांना भूतकाळाचा गंध नाही, आपल्या माणसांचा त्यात स्पर्श नाही.. आपण एकाकी असल्याच्या जाणीवा इथल्या खाणाखुणा देत रहातात. ओळखीच्या खुणेपाशी भेटायला बोलवावं असे मित्रमैत्रिणी इथे नाहीत.. इथे कुणीच आपली ओळख सांगत नाही.
इथल्या रस्त्यांवरच्या खाणाखुणा आता कुठे अंगवळणी पडायला लागल्या.. सुरुवातीला तर केवळ घराची वाट चुकू नये याकरिता त्यांची ओळख ठेवायचे मी .. तितकीच त्यांची ओळख.. नि तितकीच त्यांची सोबत ..
आपण रस्ता चुकलो .. हरवलो .. तर इथे परक्या शहरात कोण येईल आपल्याला शोधत ओळखीच्या खुणांनी .. कोणीच नाही.. तरीही आपल्याला घर आहे म्हणून जबाबदारीचं भान आहे.. रस्ता चुकायची आपल्याला मुभा नाही, म्हणून घरी न चुकता परतायचं.
रस्ते .. हे रस्तेही मोठे आठवणीत रहातात..
मला तर अगदी तेही दिवस आठवतात, जेव्हा आईनं एकटीला घराबाहेर जाऊ द्यायला सुरुवात केली होती.. तेव्हाही असंच वाटायचं मला, की समजा घराबाहेर गेलो आणि घराचा रस्ताच सापडला नाही आपल्याला तर ..
आता मात्र असंच वाटतं की रस्ता तर सापडेल पण वाट पहाणारं कुणीच घरी नसेल ..
तरीही पावलं, नव्या नव्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत रहातात नि पुढे पुढे जात रहातात.. जीवनाची वाट तुडवत रहातात.. कधी सोबत घेऊन कोणाची तर कधी एकट्यानेच समर्थपणे पुढे पुढे जात रहातात.
आणि .. या सगळ्या रस्त्यात नव्या नव्या ओळखीच्या खुणा तयार करत जातात, सोबत घेऊन त्यांना आपली पावलं चालत रहातात..
शेवटाकडे येताना आपली पावलं .. आपली ओळख निर्माण करत जातात. तेव्हा ओळखीच्या खाणाखुणांनाही आपला अभिमान वाटत रहातो .. आपल्याशी त्यांची फार जुनी ओळख असल्याचा ..
- मोहिनी घारपुरे-देशमुख
ती फुलं तुडवत जाताना अगदी वाईट वाटायचं.. पण रस्त्याच्या कडेकडेने वाट काढत येणंच तेव्हा योग्य होतं. मग त्यातल्या त्यात चार पाच टप्पोरी फुलं वेचून आणायची नि घरी आल्यावर आईला द्यायची.
सुंदर दिवस होते ते..
आता आपण तसे नाही.. आता आपण तिथे रहात नाही.. त्या रस्त्यावर गेलं की ते झाडं मात्र तिथेच उभं दिसतं.. तसंच बहरलेलं .. तसंच डोलत दिसतं.. मग मनाला जरासं बरं वाटतं..
आता शहर वेगळं.. रस्ते वेगळे.. ओळखीच्या खाणाखुणाही नव्याने निर्माण झालेल्या.. त्यांना भूतकाळाचा गंध नाही, आपल्या माणसांचा त्यात स्पर्श नाही.. आपण एकाकी असल्याच्या जाणीवा इथल्या खाणाखुणा देत रहातात. ओळखीच्या खुणेपाशी भेटायला बोलवावं असे मित्रमैत्रिणी इथे नाहीत.. इथे कुणीच आपली ओळख सांगत नाही.
इथल्या रस्त्यांवरच्या खाणाखुणा आता कुठे अंगवळणी पडायला लागल्या.. सुरुवातीला तर केवळ घराची वाट चुकू नये याकरिता त्यांची ओळख ठेवायचे मी .. तितकीच त्यांची ओळख.. नि तितकीच त्यांची सोबत ..
आपण रस्ता चुकलो .. हरवलो .. तर इथे परक्या शहरात कोण येईल आपल्याला शोधत ओळखीच्या खुणांनी .. कोणीच नाही.. तरीही आपल्याला घर आहे म्हणून जबाबदारीचं भान आहे.. रस्ता चुकायची आपल्याला मुभा नाही, म्हणून घरी न चुकता परतायचं.
रस्ते .. हे रस्तेही मोठे आठवणीत रहातात..
मला तर अगदी तेही दिवस आठवतात, जेव्हा आईनं एकटीला घराबाहेर जाऊ द्यायला सुरुवात केली होती.. तेव्हाही असंच वाटायचं मला, की समजा घराबाहेर गेलो आणि घराचा रस्ताच सापडला नाही आपल्याला तर ..
आता मात्र असंच वाटतं की रस्ता तर सापडेल पण वाट पहाणारं कुणीच घरी नसेल ..
तरीही पावलं, नव्या नव्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत रहातात नि पुढे पुढे जात रहातात.. जीवनाची वाट तुडवत रहातात.. कधी सोबत घेऊन कोणाची तर कधी एकट्यानेच समर्थपणे पुढे पुढे जात रहातात.
आणि .. या सगळ्या रस्त्यात नव्या नव्या ओळखीच्या खुणा तयार करत जातात, सोबत घेऊन त्यांना आपली पावलं चालत रहातात..
शेवटाकडे येताना आपली पावलं .. आपली ओळख निर्माण करत जातात. तेव्हा ओळखीच्या खाणाखुणांनाही आपला अभिमान वाटत रहातो .. आपल्याशी त्यांची फार जुनी ओळख असल्याचा ..
- मोहिनी घारपुरे-देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा