मला चांगलाच आठवतोय तो दिवस .. ज्या दिवशी मी पहिल्यांदा आणि एकदाच नाशिकमधल्या वेश्यावस्तीतल्या एका वेश्याग्रुहात गेले होते. तिथे जाऊन तिथल्या प्रत्यक्ष स्थितीवर मला एक लेख लिहायचा होता.
मी आत गेले तर उग्र दर्प शिरला नाकात .. क्षणभर अस्वस्थ व्हायला झालं. मधल्या मोकळ्या हॉलमध्ये एक फळा ठेवलेला होता. तिथल्या लहान मुलांना शिकवायला कोणी तिथे येत असल्याचं कळलं..
मी अवघडून बसले होते पण मी निरीक्षण करत होते. इतक्यात दोन तीन त्रुतीयपंथी तिथे आले. तिथे सामाजिक कार्यकर्त्या आसावरीजी होत्या त्यांची मी वाट बघत होते. या तिघांनी मला किससे मिलना है विचारलं .. आणि माझं नाव विचारलं आणि माझं नाव ऐकताच ते सूचक हसले एकमेकांकडे पाहून ! मग एकजण म्हणाला, ' मुझे तो मेरी मोहिनी की याद आ गयी ..!' आणि ते हसले पुन्हा सगळे ..
अधेमधे इकडून तिकडे ये जा करणाऱ्या बायका दिसल्या. त्या शरीराने, मनाने पूर्ण थकलेल्या होत्या हे त्यांचे चेहरेच सांगत होते ..
ती वेळ साधारण दुपारी अडीच ते चार अशी होती .. मी तिथल्या अंधाऱ्या खोलीची .. उग्र दर्पाची आणि उदासवाण्या दुपारीची काहीकाळ साक्षीदार झाले होते.. नंतर ऑफीसला आले आणि मनापासून जे सुचलं ते टाइपत गेले ..
शहराने फुल्या मारलेल्या कोपऱ्याची कथा माझ्या शब्दात मांडली ... फुल्याफुल्यांचा कोपरा हे मी दिलेलं शीर्षक नंतर संपादकीय प्रक्रीयेत बदलून घायाळ कोपरा असं केलं गेलं .. जे मला फारसं रूचलं नव्हतं तेव्हाही .. पण ठीक आहे .. 'चालसे' .. !
आज जुनी कात्रणं पहात असताना हा माझा लेख सापडला आणि या आठवणी जाग्या झाल्या .. खरंतर या आठवणी विसरणं शक्यच नाही .. !
- मोहिनी
( From my facebook memory)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा